कुतुबुद्दीन अन्सारीचे छााचित्र खरे आहे

सत्य – कुतुबुद्दीन अन्सारी दंगलखोरांसमोर दयेची भीक मागत आहेत, असे एक छायाचित्र ‘हिंदू’ने २ मार्च २००२ ला प्रसिद्ध केले. अन्सारी यांनी ‘पुन्हा ते छायाचित्र छापू नका’ अशी विनंती केल्यामुळे आम्ही ते पुन्हा इथे देत नाही. भाजपा, विहिंप आणि बजरंग दल यांची प्रतिमा देशभर मलिन करण्यासाठी हे छायाचित्र पुन्हा पुन्हा वापरण्यात आले. हे पीडित अंसारी दंगलखोरांसमोर प्राणाची भीक मागतात आहेत,असे माध्यमांनी अनेकदा म्हटले आहे. या अन्सारींना पश्‍चिम बंगालमधील डाव्या पक्षांच्या सरकारने मदत दिल्यामुळे, ते कोलकात्यात सुखाने राहात असल्याचे नंतर दाखविण्यात आले. (डाव्या आघाडीने बंगालमध्ये १९७७ ते २०११ राज्य केले). अंसारी नंतर गुजरातला परतले. या घटनेतून अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. (संघाचे तत्कालीन सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांनी नागपूरमधील ४ ऑक्टोबर २००३ च्या भाषणात यापैकी काही प्रश्‍न विचारले होते.) ते प्रश्‍न असे :

१. हे छायाचित्र बनावट असावे, अशा अनेक गोष्टी सहज लक्षात येतात. (म्हणजे अन्सारी खरोखरच अशा स्थितीत असावेत, पण घटना संपल्यानंतर, जमाव निघून गेल्यानंतर ते चित्र घेतले गेले असावे, किंवा एक शक्यता अशीही आहे, की घटना घडून गेल्यानंतर छायाचित्रकाराने अन्सारींना ती पोज घेण्यास सांगितले असेल, पण अशी शक्यता आम्हाला कमी वाटते.) अन्सारींच्या चेहरयावर बँडेज बांधले आहे. घटना घडून गेल्यानंतर बँडेज बांधून मग छायाचित्र काढले असावे, असे स्पष्ट दिसते. रक्तासाठी हपापलेला प्रक्षुब्ध जमाव खरोखरच अन्सारींच्या अंगावर चालून येत असताना त्यांनी दयेची भीक मागितली असताना हे छायाचित्र काढले असेल, तर त्यांना बँडेज बांधायला वेळ कधी िमळाला?

२. या छााचित्रात अन्सारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून दंगलखोरांकडे दयेची भीक मागत आहेत, असे म्हणतात, पण छायाचित्रात एकही दंगलखोर मात्र दिसत नाही. छााचित्रकार आर्को दत्त त्यावेळीच छायाचित्र काढायला इमारतीत हजर होते, आणि त्या दोघांनाही दंगलखोरांनी काहीच न करता मोकळे सोडले, हे विश्वास ठेवायला कठीण वाटते. कुतुबुद्दीन अन्सारी हे या दंगलीचे पीडित आहेत, यात शंका नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पण याचा अर्थ, खोटे छायाचित्र काढून जगभर वितरित करून निष्पाप लोकांना अतिरेकासाठी उद्युक्त करण्याचा परवाना त्यांना (मीडिया व मुस्लिम अतिरेकींना) कोणी दिलेला नाही.

३. दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला न करता, त्यांना मोकळे कसे सोडले?

४. दंगलखोरांनी छायाचित्रकाराला असे छायाचित्र कसे काढू दिले? त्याच्यावर हल्ला का केला नाही?

५. अन्सारी आणि तो छााचित्रकार या दोघांनाही संतप्त जमावाने जिवंत सोडले, तर किमान त्यांचा कॅमेरा तरी का मोडून टाकला नाही?

६. रॉयटरचे छायाचित्रकार आर्को दत्त वरीलपैकी एकातरी प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतात का?

७. या सर्व प्रश्‍नांची किंवा या घटनाक्रमातून समोर येणारया इतर प्रश्‍नांची उत्तरे अन्सारी देऊ शकतात का?

 

   या सर्व प्रकरणाचे बळी ठरलेले कुतुबुद्दीन अन्सारी यांनी असे म्हटल्याचे कळते, ‘जमाव माझ्या घरावरून निघून गेल्यानंतर हे छायाचित्र घेतले आहे. त्यावेळी पोलीस तेथे होते आणि मी खूप घाबरलो होतो. अशावेळी मी पोलिसांना म्हणालो की मला वाचवा, तेव्हा ते छायाचित्र घेण्यात आले.’ अशाच प्रकारची माहिती गुजरातमधील एका वरिष्ठ पत्रकाराने लेखकाला दिली. पण लेखकाला मात्र तशा प्रकारची कोणतीही माहिती किंवा बातमी इंटरनेटवर सापडली नाही. अन्सारींवर अन्याय करायचा नसेल, तर हेही सांगितले पाहिजे की, “दंगलखोरांकडे आपल्या प्राणाची भीक मागत होतो”, असे अंसारी म्हणाल्याचेही कुठलेही वृत्त वेबवर नाही (किमान या लेखकाला दिसले नाही). कदाचित असे असेल की, आपण रक्तपिपासू जमावासमोर अशी भीक मागितली, हे अन्सारी यांनीच नाकारले. आता कोणीतरी हे त्यांना स्पष्टपणे विचारले पाहिजे. आपण जमावापुढे प्राणाची भीक मागितली, असा जर अन्सारींचा दावा असेल, तर चेहरयावर बँडेज कुठून आले, हेही विचारले पाहिजे. आपल्या छायाचित्राचा वारंवार उयपोग झाल्यामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या त्रासामुळे ते ऑगस्ट २००३ पासूनच ‘मला त्रास देऊ नका आणि मोकळं सोडा’ असे माध्यमांना सांगत होते. 

(संदर्भ:   http://hindu.com/2003/08/08/stories/2003080806871100.htm )

 

   आम्ही पुन्हा एकदा सांगतो की दंगलीतील पीडितांबद्दल (मुसलमान असो की हिंदू) आम्हाला आत्यंतिक सहानुभूती आहे. काहीही असले, तरी कुतुबुद्दीन अन्सारी हे दंगलीचे पीडित होते, यात शंकाच नाही.

 

   आपण दुसरया प्रकरणात गोधरा हत्याकांडातील थरकाप उडविणारी छायाचित्रांची लिंक पाहिली आहे. ही छायाचित्रे १०० टक्के खरी असली तरी माध्यमे विशेषत: एन.डी.टी.व्ही. आणि सी.एन.एन.आय.बी.एन.सारख्या वाहिन्या ती छायाचित्रे दाखविण्याचे कधी स्वप्नातही आणणार नाहीत. लोकांच्या भावना भडकविणारे कुतुबुद्दीन अन्सारीचे छायाचित्र मात्र जगभर प्रसारित केले जाईल. गोधरामध्ये हिंदूंना जाळून मारल्यानंतर मुस्लिमांच्या मनात निर्माण झालेला अपराधीपणा, त्या हत्याकांडाची छायाचित्रे पाहिल्यानंतर इतर मुस्लिमापर्यंत (कदाचित उदारमतवाद्यापर्यंत) पोचला असता तर गोधरानंतरच्या दंगलींमुळे ते एवढे भडकले नसते. (या दंगलीही एकतर्फी नव्हत्या.)

कल्पित कथा