२००२ मध्ये गुजरातमध्ये राहणे धोकादायक झाले होते

सत्य- ‘इंडिया टुडे’ने २५ नोव्हेंबर २००२ च्या अंकात एक जनमत चाचणी प्रसिद्ध केली. त्यात एक प्रश्‍न विचारण्यात आला होता, ‘आज गुजरातमध्ये राहताना तुम्हाला सुरक्षित वाटते का?’ या प्रश्‍नाला ६८ टक्के लोकांनी होकारार्थी म्हणजे ‘सुरक्षित वाटते’ असे उत्तर दिले. ५६ टक्के मुस्लिमांनी आपण सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले. या संपूर्ण जनमत चाचणीवर मत व्यक्त करताना ‘इंडिया टुडे’ने म्हटले:  “मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक भूिमकेमागे मतदार ठामपणे उभे आहेत. दंगली या गोधराची प्रतिकिया होत्या, या त्यांच्या (मुख्यमंत्र्यांच्या) म्हणण्याला लोकांचा पाठिंबा आहे. गुजरातच्या बाहेर राहणारयांनी राज्याला लज्जास्पद ठरविले (बदनाम केले), या मुख्यमंत्र्यांच्या आरोपालाही त्यांनी मान्यता दिली आहे. आणि गुजरात राज्य राहण्यासाठी धोकादायक झाले आहे, असे सुचविणारया शक्यताही लोक तुच्छ्पणे धुडकावून लावतात.”

(संदर्भ: http://archives.digitaltoday.in/indiatoday/20021125/cover2.html )

कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *