एहसान जाफरी प्रकरणात महिलांवर बलात्कार झालेत

सत्य- अरुंधती रॉय यांनी ‘आउटलुक’ साप्ताहिकाच्या ६ मे २००२ च्या अंकात एहसान जाफरी प्रकरणावर लिहिलेल्या लेखातील काही अंश असा आहे: 

 

   ‘‘काल रात्री बडोद्याहून मला एका मैत्रिणीचा फोन आला. ती रडत होती. काय घडले हे सांगायला तिला १५ िमनिटे लागली. ते काही फार गुंतागुंतीचे नव्हते. फक्त, तिची मैत्रीण सईदा एका जमावाच्या हाती सापडली. फक्त, तिचे पोट फाडण्यात आले आणि पोटात जळत्या चिंध्या भरण्यात आल्या. फक्त, ती मेल्यानंतर कोणीतरी तिच्या कपाळावर ॐ हे अक्षर कोरले…

   …माजी कॉंग्रेस खासदार इक्बाल एहसान जाफरी यांच्या घराला एका जमावाने वेढा घातला. त्यांनी पोलीस महाअधीक्षक, पोलीस आयुक्त, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना फोन केले. पण सर्वांनी दुर्लक्ष केले. (नरेंद्र मोदी यांना फोन केल्याचा दावा इथे केलेला नाही, याची नोंद घ्या!) त्यांच्या घराभोवती िफरणारया पोलीस गाड्यांनीही दखल घेतली नाही. जमाव घरात घुसला, त्यांनी जाफरी यांच्या मुलींना विवस्त्र करून जिवंत जाळले. नंतर एहसान जाफरी यांचे मस्तक उडविण्यात आले. अर्थात, राजकोटमधील फेब्रुवारीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जाफरी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कडवट टीका केली होती, हा निव्वळ योगायोग आहे…’’ 

(संदर्भ : http://www.outlookindia.com/article.aspx?215477 )

 

   भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन राज्यसभा खासदार बलबीर पुंज यांनी अरुंधती रॉय यांना दिलेले प्रत्युत्तर छापण्याची हिंँमत ‘आउटलुक’ने दाखविली. या प्रत्युत्तराचे शीर्षक असे होते ‘‘गुजरात जळत असताना सत्याचा अपलाप”(“Fiddling with facts while Gujarat burns”). 

 

   ‘‘सुरुवात : माध्यमांमधील रॉय मंडळी अर्धसत्य आणि आणखीन वाईट सांगून भारताचे नुकसान करीत आहेत. (इथे पुंज यांनी रॉय यांच्या लेखातील काही वाक्ये दिली आहेत…)

   ‘डेमोक्रसी: हू इज शी व्हेन शी इस अ‍ॅट होम?’ या ‘आउटलुक’मधील आपल्या लेखात ‘गॉडेस ऑफ स्मॉल थिंग्ज’ म्हणून ओळखल्या जाणारया अरुंधती रॉय यांनी गुजरातचे असे मोठे चित्र रेखाटले आहे. संघपरिवाराविरुद्ध केले जाणारे जवळपास सर्व आरोप रॉय यांनी एकाच लेखात नीटपणे केले आहेत. ‘आउटलुक’सारखे प्रतिष्ठित साप्ताहिक एखाद्या बुकर पुरस्कारविजेत्या लेखकाचा लेख प्रसिद्ध करते, तेव्हा ते गंभीर समजावे लागते. (आमचे मत-–इथे बलबीर पुंज यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. आमच्या मते ‘आउटलुक’ हे ‘प्रतिष्ठित साप्ताहिक’ नाही, तर कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेले नितकालिक आहे. अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्कार िमळाला असला, तरी त्या अतिडाव्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात आणि अनेक लोक त्यांचे लेखन गंभीरपणे घेत नाहीत.) ‘सत्य’ सांगण्यासाठी रॉय यांनी आपली प्रतिभा आणि भाषाकौशल्य पणाला लावले आहे. त्यांचे हे चित्रांकित तपशील पहा – ‘जमाव घरात घुसला, त्यांनी जाफरींच्या मुलींना विवस्त्र केले आणि जिवंत जाळले.’…

   हे हृदयस्पर्शी नक्कीच आहे, पण प्रामाणिक मात्र नाही. जाफरी दंगलीत मारले गेले, पण त्यांच्या मुलींना ‘विवस्त्र’ही केले गेले नाही किंवा ‘जिवंत जाळले’ही गेले नाही. जाफरींचा मुलगा टी.ए. जाफरी याची मुलाखत एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रकाशित झाली आहे. शीर्षक आहे – ‘‘माझ्या वडिलांचे घर लक्ष्य आहे, हे कोणालाच माहीत नव्हते.” (एशियन एज, दिल्ली आवृत्ती, २ मे २००२) ते म्हणतात, ‘माझ्या भावा आणि बहिणींपैकी मी एकटाच भारतात राहतो. कुटुंबात मी सर्वात मोठा आहे. माझा भाऊ आणि बहीण अमेरिकेत राहातात. मी ४० वर्षांचा असून माझा जन्म आणि पूर्ण आयुष्य अहमदाबादमध्येच गेले.’

   याचा अर्थ रॉय खोटे बोलत आहेत, कारण जाफरी नक्कीच खोट बोलत नाही आहेत. पण आजवर उघड्या न पडलेल्या माध्यमांच्या अशा शेकडो असत्य कथांचे काय? त्यांचा ७ पानांचा (सुमारे ६,००० शब्द) लांबलचक लेख भारत आणि संघपरिवार याबद्दलचा विद्वेष ओकणारा आहे, त्याचा आधार फक्त दोन विशिष्ट कथा होत्या. त्यातील एक खोटी असल्याचे आता आपल्याला निश्चित कळले आहे…

   …संघपरिवाराची ‘लॅबोरेटरी’ गुजरात हा प्रदेश आहे, असे त्या म्हणतात. प्रत्यक्षात धर्मनिरपेक्षतावादी मूलतत्त्ववाद्यांनी (‘secular fundamentalists’) गोधरा प्रकरणाचा उपयोग crucible म्हणून केला. रामसेवकांना जिवंत जाळून मारले असताना या घटनेचा निषेध करतानाच त्यांनी दोषही रामसेवकांवरच ढकलला, यात काही आश्चर्य नाही. (गोधरातील) नृशंस हत्याकांडाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी टपरीवाल्यांशी झालेले भांडण, महिलांशी गैरवर्तन आणि प्रक्षोभक घोषणा, अशा काल्पनिक घटना आपल्या मनाने शोधून काढल्या…

   …पण गुजरातमध्ये घडला तो मुस्लिमांचा ‘नरसंहार’ होता का? दंगलीत सुमारे ९०० लोक मारले गेले (हिंदू, मुस्लिम दोन्ही). हे नक्कीच एका समुदायाचे ‘नरसंहार’ नव्हते. तरीही १८९३ मध्ये मुंबई आणि आझमगडमध्ये झालेल्या दंगलींपासून सुरू झालेल्या दीर्घ आणि दुर्दैवी सांप्रदायिक दंगलींच्या साखळीपैकीच ही देखील एक लज्जास्पद घटना होती. मोगलकाळात १७१४ मध्ये झालेल्या होळी दंगलीपासून सुरुवात केली, तर एकट्या अहमदाबाद शहरानेच १० मोठ्या दंगली अनुभवल्याचे नोंदविले गेले आहे.

   १७१४ मध्ये संघपरिवार नव्हता आणि १९६९ आणि १९८५ च्या दंगलकाळात तो महत्त्वाची शक्ती  नव्हता. गुजरात हा ‘संघपरिवाराची प्रयोगशाळा’ नव्हता तेव्हा झालेल्या दंगलींचे विश्‍लेषण आपण कसे करणार?…

   …गोधरा हत्याकांडामुळेच गुजरातमध्ये मुस्लिमांविरुद्धचा उत्स्फूर्त हिंसक उद्रेक झाला. हे दंगलखोर मुख्यत: हिंदूच असल्यामुळे पहिल्या ३ दिवसांत पोलिसांच्या गोळीबारात मारले गेलेल्यांपैकी ७५ टक्के लोक हिंदू होते. वास्तवात १८ एप्रिलर्पंत पोलीस गोळीबारात मारले गेलेल्यात हिंदूंचीच संख्या मुस्लिमांपेक्षा जास्त होती.

   पण गेले ३ आठवडे मुस्लिम हिंदूंवर हिंसक हल्ले चढवीत आहेत. त्यामुळे पोलिस गोळीबारातील मृतांमध्ये स्वाभाविकपणे त्यांचीच संख्या जास्त आहे. पोलिसांनी एकूण ३४ हजार लोकांवर दंगलींचे गुन्हे नोंदविले आहेत. त्यापैकी बहुसंख्य हिंदू आहेत. जाळपोळ आणि लुटालुटीमध्ये दोन्ही समाजाच्या मालमत्तेचे आणि व्यवसायांचे जबर नुकसान झाले आहे. दंगलखोर धर्मांधतेची भावना मनात ठेवून आपले लक्ष्य ठरवीतात, पण लुटालूट करणारे तसे नसतात. ते कुठेही, कशीही लुटालूट करतात. १ लाख मुस्लिम दंगलग्रस्त म्हणून शिबिरांत आहेत, पण तसेच ४० हजार हिंदूही आहेत. या दंगली भयंकर आणि अत्यंत दु:खद आहेत. पण त्यांना ‘नरसंहार’ का म्हणावे? त्याचा फायदा कोणाला होतो? दंगलीतील पीडितांना नक्कीच नाही, त्याचा फायदा होतो फक्त आपल्या सीमेपलीकडील शत्रूंना.

   भारतात आतापर्यंत झालेल्या असंख्य दंगलींसारखीच ही एक दंगल असली, तरी यावेळेस जगभर भारताची मोठी अप्रतिष्ठा झाली आहे, जी आधी झाली नव्हती. का? याचे गुन्हेगार, गोधरात रेल्वे डब्यांना पेटवून देऊन निष्पाप कारसेवकांना जिवंत जाळणारे आणि त्यांनंतर दंगलींच्या वेड्या हिंसाचारात सहभागी होणारे आहेत. पण यातील खरे खलनायक मात्र भारताची प्रतिमा विद्रूप करणारे माध्यमांतील रॉय यांच्यासारखे लोक आणि सार्वजनिक जीवनातील काही लोक आहेत. संघपरिवाराशी असलेले त्यांचे भांडण आणि वैचारिक व राजकीय विरोध याचे हिशोब चुकते करण्यासाठी ते अर्धसत्य आणि कल्पित थापा यांचे बेमालूम िमश्रण करीत आहेत.

   आपल्या विद्वेषाचे गरळ ओकण्यासाठी रॉय (या अनेक धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या रोल मॉडेल आहेत) सईदा नावाच्या एका महिलेची कथा सांगतात, ‘तिचे पोट फाडण्यात आले आणि त्यात जळत्या चिंध्या भरण्यात आल्या.’ मी अशाच काही भयानक कहाण्या संसदेतही ऐकल्या. त्यामध्ये वारंवार सांगितल्या जाणारया कहाण्या महिलेंवरील बलात्काराच्या होत्या, काही घटनांमध्ये सामुदायिक बलात्काराच्या काहाण्या, त्यांचे पोट फाडून भृणाला बाहेर काढण्याच्या आणि त्रिशूळाच्या टोकावर ठेवून नाचविण्याच्या कहाण्या. पण सर्व तपशील असणारे एकही विशिष्ट प्रकरण कोणीही मला संसदेत देऊ शकले नाही. रॉय यांनी एक दिले, पण ते पूर्णपणे कल्पित असल्याचे सिद्ध झाले…

   …कल्पित कथा, स्वरचित कथा यांनी गुजरातचे सत्य झाकोळून टाकले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने (३ मार्च २००२) आपल्या बातमीत, मोदींनी न्यूटनच्या तिसरया नियमाचा उल्लेख केल्याचे म्हटले होते – ‘प्रत्येक क्रियेला तेवढ्याच क्षमतेची आणि विरोधी प्रतिक्रिया उमटते.’ मुळात मुख्यमंत्री मोदी असे काही बोललेच नव्हते आणि ‘टाइम्स’शिवाय इतर कोणत्याही वृत्तपत्राने मोदींच्या या तथाकथित वक्तव्याचा उल्लेख ३ मार्चला केला नव्हता. पण त्यानंतरच्या कितीतरी संपादकीयांमध्ये या विधानाला आधार मानून गरळ ओकण्यात आले. मोदींनी असे विधान केल्याचे नाकारले असतानाही, त्यांच्या खुलाशांना केराच्या टोपलीत टाकण्यात आले.

   गुजरातमधील दंगलींच्या वार्तांकनाबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’ने इंग्रजी वृत्तपत्रांची पाठ थोपटली, तर गुजराती भाषिक वृत्तपत्रांवर कठोर टीका केली. गुजराती वृत्तपत्रे अतिशयोक्तीबाबत दोषी असतील, पण त्यांनी रॉय यांच्यासारख्या इंग्रजी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या कपोलकल्पित कथा तरी दिलेल्या नाहीत. भारताचे नाव बदनाम करणारया, नाजूक क्षणी सांप्रदायिक तेढ वाढविणारया, अर्धसत्य सांगून असंख्य नागरिकांना भ्रमित करणारया रॉय सारख्या लोकांबद्दल आणि टी.व्ही. माध्यमांबद्दल मात्र ‘गिल्ड’ने टीकेचा चकार शब्दही काढला नाही, हे आश्चर्यकारक आहे. ज्या काही गुन्हेगारांनी बलात्कार केले असतील, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण गेले २ महिने सत्यावर आणि देशावर जे लोक सातत्याने बलात्कार करीत आहेत, त्यांचे काय?”

(संदर्भ : http://www.outlookindia.com/article.aspx?215755 )

 

   यामुळे सगळाच खेळ उलटला. अरुंधती रॉय यांनी २७ मे २००२ च्या अंकात माफी मागणारे पत्र लिहिले. ‘टु द जाफरी फॅमिली, ऍन अपॉलॉजी’ (जाफरी परिवराला एक माफी) असे शीर्षक असणारया या पत्रातील मजकूर असा –

   ‘‘जेव्हा पोलीस गुन्ह्याची नोंद करण्यास इच्छूक नाहीत, सत्य जाणून घेणारयांच्या विरोधात प्रशासन उघडपणे असते आणि हत्या अनिर्बंधपणे चालू असतात [अशी स्थिती गुजरातमध्ये सध्या आहे], तेव्हा भीती आणि अफवा महत्त्वाची भूिमका बजावतात. (रॉय सर्व दोष दुसरयांना कसा देत आहेत, ते पहा!) बेपत्ता झालेले लोक मृत झाले आहेत, असे समजले जाते. ज्यांना जाळून मारले, त्यांची ओळख पटत नाही. अशा परिस्थितीत सुन्न झालेले आणि भेदरलेले लोक संदिग्ध अवस्थेत असतात.

   म्हणूनच आमच्यासारखे लेखक लिहिताना अत्यंत भरवशाच्या सूत्रांकडून िमळालेल्या माहितीचा वापर करीत असले, तरी चुका होऊ शकतात. सध्याच्या हिंसाचार, दु:ख आणि अविश्‍वासाच्या वातावरणाने लोक भारलेले असताना दाखवून दिलेल्या चुका दुरुस्त करणे, तेवढेच महत्त्वाचे आहे.

   ‘डेमोक्रसी : हू इज शी, व्हेन शी इज ऍट होम’ (Democracy: Who is she when she is at home?), या ६ मे च्या माझ्या निबंधामध्ये एक चूक झाली आहे. एहसान जाफरी यांच्या क्रूर हत्येचे वर्णन करताना, वडिलांबरोबरच त्यांच्या मुलीही मारल्या गेल्या, असे मी म्हटले होते. पण माझ्या हे लक्षात आणून देण्यात आले आहे, की ते चूक आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार एहसान जाफरी यांच्याबरोबर त्यांचे ३ भाऊ आणि २ पुतणे मारले गेले. त्या दिवशी चमनपुरा भागात बलात्कार करून मारल्या गेलेल्या १० महिलांमध्ये जाफरी यांच्या कन्या नव्हत्या.

   त्यांच्या दु:खात भर घालण्याच्या प्रमादाबद्दल मी जाफरी कुटुंबीयांची माफी मागते. आय ऍम ट्रूली सॉरी! (I am truly sorry.)

   माझी माहिती ही दोन सूत्रांकडून तपासून घेतली होती. (ती प्रत्यक्षात चुकीची ठरली.) ‘टाइम’ नितकालिकाच्या ११ मार्चच्या अंकात मीनाक्षी गांगुली आणि अँथनी स्पीथ यांचा लेख आणि ‘गुजरात कार्नेज २००२ : अ‍ रिपोर्ट टु द नेशन’ या स्वतंत्र सत्यशोधक समितीच्या अहवालातील माहिती. त्रिपुराचे माजी आय.जी.पी. श्री के.एस. सुब्रमण्यम  आणि माजी अर्थसचिव एस.पी. शुक्ला यांनी हा अहवाल तयार केला आहे. या चुकीबद्दल मी श्री सुब्रमण्यम यांच्याशी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार एका वरिष्ठ पोलीस अधिकारयाने त्यांना ही माहिती दिली होती. (हे ‘वरिष्ठ पोलिस अधिकारी’ नेमके कोण होते, हे मात्र सुब्रमण्यम किंवा अरुंधती रॉय सांगायला तयार नाहीत!)

   गुजरातमधील हिंसाचाराचे तपशील सांगत असताना झालेल्या या किंवा अशा प्रामाणिक चुकांमुळे मी, सत्यशोधन समित्या किंवा इतर पत्रकार जे सांगू पहात आहेत, त्याचा सारांश मात्र बदलत नाही.’’

 

   बलबीर पुंज यांनी ४ वर्षांनंतर लिहिलेला एक लेख ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या ९ जुलै २००६ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी लिहिले: 

 

   ‘‘चार वर्षांपूर्वी अरुंधती रॉय यांच्याबरोबर माझा वृत्तपत्रात वाद झाला होता. कारण होते, गुजरातच्या दंगली. सेक्युलर ब्रिगेडच्या दृष्टीने ही प्रसिद्धीची पर्वणीच होती. पण आज दोडामध्ये हिंदू मारले जात असताना, हे ‘सेक्युलर’ कुठेही दिसत नाहीत, अगदी दुर्बिणीतून पाहिल्यावरही सापडत नाहीत… 

   रॉय यांनी आपल्या विद्वेषाचा विखार ओकताना एक उदाहरण दिले: ‘काल रात्री मला बडोद्याहून एका मैत्रिणीच फोन आला. ती रडत होती. काय घडले ते सांगायला तिला १५ िमनिटे लागली. ते काही फार गुंतागुंतीचे नव्हते. तिची मैत्रीण सईदा एका जमावाच्या हाती सापडली. तिचे पोट फाडण्यात आले आणि पोटात जळत्या चिंध्या भरण्यात आल्या. ती मेल्यानंतर कोणीतरी तिच्या कपाळावर ॐ हे अक्षर कोरले…

   या घृणास्पद ‘घटनेने’ धक्का बसल्यामुळे मी गुजरात सरकारशी संपर्क साधला. तपास करणारया पोलिसांनी असे सांगितले, की सईदा नावाच्या महिलेबाबत अशी काही घटना घडल्याची कोणतीही नोंद बडोद्यातील शहरी किंवा ग्रामीण भागातून झालेली नाही. या सईदाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अरुंधती रॉय यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची मदत मागितली साक्षीदारांपर्यंत पोचायला, जे दोषींपर्यंत पोचवू शकतील. पण रॉय यांच्याकडून पोलिसांना कोणतेही सहर्काय िमळाले नाही. याउलट रॉय यांनी पोलिसांना आपल्या वकिलामार्फत उत्तर पाठविले की पोलिसांना त्यांच्यावर समन्स बजावण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा रीतीने त्या तांत्रिक बहाण्यांच्या मागे लपल्या. ‘आउटलुक’मध्ये रॉय यांच्या लेखाचा प्रतिवाद करताना ‘डिसिम्ुलेशन इन वर्ड अँड इमेजेस’ या लेखात मी याचा उल्लेख केला (द आउटलुक, ८ जुलै २००२). ”

 

   बलबीर पुंज यांनीही उल्लेख न केलेल्या काही गोष्टी इथे आम्ही सांगितल्या पाहिजेत. रॉय यांच्या माफीनामाही खोटा आहे, कारण यातही चुका आहेत. ‘त्या दिवशी चमनपुरात १० महिलांवर बलात्कार करून त्यांना मारण्यात आले’ असा दावा त्यांनी या माफीलेखात केला आहे. मार्च २००२ च्या पहिल्या आठवड्यातील सर्व इंग्रजी वृत्तपत्रे वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, की कोणाच्याही बातमीत बलात्काराचा एक उल्लेखही नाही. ‘टाइम’ या नितकालिकाने ११ मार्च २००२ च्या अंकात या कपोलकल्पित कथा प्रसिद्ध केल्यानंतर मार्चच्या मध्यपासून बलात्काराचे उल्लेख सुरू झाले. ही कथा अरुंधती रॉय यांनी ‘टाइम’ नितकालिकातूनच उचलली. पण रॉय किंवा ‘टाइम’च्या प्रतिनिधींना बलात्काराचे सिद्ध झालेले एकही प्रकरण दाखविता आले नाही, या गुलबर्ग सोसायटी मध्ये, आणि ते दाखवूही शकत नाही. रॉय यांनी जाफरी कुटुंबीयांची माफी मागितली. पण सपशेल खोटे दावे करून. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याबद्दल मात्र त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी हेही करायला हवे होते आणि देशाचीही माफी मागायला हवी होती. पण रॉय माफी मागतानासुद्धा खबरदारी घेतात की ती माफी फक्त ‘जाफरी कुटुंबाची’ असावी.

 

   दुसरी चूक- जाफरी यांच्या घरावर आक्रमण करणारया जमावाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. रॉय म्हणतात, ‘डी.जी.पी., पोलीस कमिशनर, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना त्यांनी केलेले फोन दुर्लक्षिले गेले. त्यांच्या घराभोवती िफरणारया पोलीस व्हॅन्सनेेही हस्तक्षेप केला नाही.’ पुन्हा काय खोटारडेपणा! त्यांच्या घराबाहेर असलेल्या पोलिसांनी दंगलखोरांना केवळ रोखण्याचाच प्रयत्न केला नाही, तर ५ दंगलखोरांना घराबाहेर ठार मारण्यात आले आणि पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १८० मुस्लिमांना वाचविले. जाफरी यांच्या घराबाहेर पोलिसांनी अश्रुधुराची १३४ नळकांडी फोडली आणि गोळीबाराच्या १२४ फैरी झाडल्या, एस. आय. टी. च्या अहवालानुसार, पान १. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेेही आपल्या ऑनलाइन बातमीत म्हटले आहे, की पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने जमाव पांगविण्यासाठी आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. पोलीस निष्क्रिय होते, असा आरोप कुठेही ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने केलेला नाही.

   

   तत्कालीन पोलिस कमिशनर पी.सी.पांडे यांना २८ फेब्रुवारी २००२ ला ३०२ कॉल्स आलेत किंवा त्यांनी केलेत, पण जाफरी यांचा कोणताही कॉल त्यांना आला नाही, असे एस.आय.टी ने त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासून म्हटले (एस.आय.टी. आहवाल, पान २०४). आणि त्या दिवशी मुख्यसचिव जी. सुब्बाराव हे सुट्टीवर  विदेशात होते! २२ फेब्रुवारी ला विदेशात गेलेले सुब्बाराव यांना गोधरानंतर परत बोलाविण्यात आले, आणि ते लगेच १ मार्च ला परतले, पण २८ फेब्रुवारीला ते विदेशात होते! हे देखील एस.आय.टी. ने आपल्या अहवालात पान ४४८ वर म्हटले आहे. आणि अरुंधती रॉय दावा करतात की जाफरी यांनी त्यांना वा पांडेंना २८ फेब्रुवारीला फोन केला! या अरुंधती रॉय यांच्या थापा कधी उघड्या पडल्याच नाहीत.

 

   जाफरी यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फोन केला होता, असा कोणताही दावा अरुंधती रॉय यांनी मे २००२ मध्येही केला नाही! आता मात्र ‘जाफरींनी मोदींना फोन केला आणि मोदींनी त्यांना शिवीगाळ केली’ अशा थापा सांगितल्या जात आहेत. सत्य असे आहे की त्या दिवशी हिंसाचाराची स्थिती हाताबाहेर गेल्यामुळे परिस्थिती सावरण्याच्या आणि तातडीने लष्कराला बोलाविण्याच्या प्रयत्नांत मोदी गुंतले होते आणि फार व्यस्त होते. जाफरी यांनी मोदींना फोन केल्याची कोणतीही नोंद नाही. एस.आय.टी. ने आपल्या अहवालात म्हटले आहे की जाफरी यांचा लॅंडलाईन हा एकमेव फोन पूर्ण रहिवाशी इलाक्यात कार्यरत होता. जाफरींकडे मोबाईल नव्हता आणि इतर कोणाकडेही नव्हता. जाफरी यांनी मोदींना फोन केला आणि ‘मोदींनी मला शिवीगाळ केली’ असे जाफरींनी मरण्यापूर्वी आपल्याला सांगितल्याचा दावा करणारा एक साक्षीदार इम्तियाज़ पठाण ‘ट्यूटर’ करून (शिकवलेला) उभा केलेला दिसतो. जाफरी यांनी मोदींना फोन केल्याचे इम्तिायाज पठाण खोटे सांगतो. त्या काळात मोदी मोबाईलही फार कमी वापरत असत. पठाण यानी हा दावा पहिल्यांदा नोव्हेंबर २००९ मध्ये केला, त्याने पोलिसांना २००२ साली दंगलींनंतर लगेच दिलेल्या वाक्यात असा कुठलाही आरोप केला नाही. त्या दिवशी मोदींच्या कार्यालयातील फोनच्या सर्व लाइन्स अत्यंत व्यस्त होत्या. इम्तियाज पठाणचे असेही म्हणणे आहे की पोलीस सर्व घडून गेल्यानंतर संध्याकाळी ४:३०-५:०० वाजता तेथे पाचले. पण २८ फेब्रुवारी  २००२ ला ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी ऑनलाइन प्रकाशित केलेली बातमी आपण पाहिली आहे की पोलीस आणि अग्निशमन दल फार आधीच घटनास्थळी पोचले होते. प्रत्यक्षात या घटनेत पोलिस गोळीबारात ५ लोक जागी ठार आणि ११ जखमी झाले. 

 

   इथे आणखी काही प्रश्‍न उपस्थित होतात. आपला जीव वाचविण्यासाठी कॉंग्रेसचे ५०० कार्यकर्ते पाठवावेत, असा फोन जाफरी यांनी एखाद्या कॉंग्रेस नेत्याला का केला नाही? त्यांनी तेही केले, असे म्हणतात. मग आपल्या माजी खासदाराचा जीव वाचविण्यासाठी कॉंग्रेेस पक्षाने काहीच का केले नाही? या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचे आरोपी म्हणून एस.आ.टी.ने कॉंग्रेस नेते मेघसिंह चौधरी यांना अटक केली. ही अटक गुजरात पोलिसांनी केली नव्हती.

 

   सांप्रदायिक दंगलींमध्ये पीडित असलेल्या अल्पसंख्यक महिलांच्या कहाण्या माध्यमे अनावश्यकपणे वाढवून सांगत आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाने तेव्हा म्हटले होते. तहलका वेबसाइटने २२ एप्रिल २००२ च्या बातमीत म्हटले, ‘राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य नफीसा हुसेन यांनी नोंदीवर म्हटल्यानुसार गुजरातमधील सांप्रदायिक दंगलीत पीडित अल्पसंख्य समाजाच्या महिलांवर झालेला हिंसाचार माध्यमांनी आणि अनेक संघटनांनी प्रमाणाबाहेर वाढवून सांगितला आहे.’ महिला आयोगाच्या एका मुस्लिम सदस्याचे हे म्हणणे होते.

कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *