गुजरात दंगल, हे भारतातील सर्वांत भयंकर हत्याकांड होते.

सत्य – स्वातंत्र्यापूर्वी १९४० च्या दशकामध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या दंगली किंवा १९६९ मध्ये झालेल्या गुजरात दंगली, यांच्याशी तुलना करता, गुजरातमधील २००२ च्या दंगली खूपच कमी गंभीर होत्या. १९४० च्या दशकातील दंगलींत तर हिंदूंनी खूप मार खाल्ला होता. गुजरातमध्ये मोठ्या दंगली १९८०, १९८५, १९९० आणि १९९२ मध्येही झाल्या होत्या.

 

   कॉंग्रेसच्या राजवटीत १९८४ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या दंगली फार अधिक भयंकर होत्या. या दंगलीत अधिकृतपणे ३ हजार लोक मारले गेले. या दंगली केवळ नवी दिल्लीपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्रिपुरा, पश्‍चिम बंगालसारख्या, नवी दिल्लीपासून खूप लांब असलेल्या प्रदेशातही दंगली झाल्यात. जम्मू-काश्मीरमध्ये १९८९ पासून ४० हजार भारतीय मारले गेले. या तुलनेत २००२ च्या गुजरात दंगलीत २ हजार मुसलमानांच्या जमावाने गोधरा हत्याकांड घडविल्यानंतरही, झालेल्या दंगलीत १२०० पेक्षा कमी लोक मारले गेले. या मृतांपैकी २५० हून अधिक जण तर हिंदूच होते. ‘गोधरा’नंतर झालेल्या दंगली ना नरसंहार (‘massacre’) होत्या ना हत्याकांड (‘pogrom’). देशातील सर्वांत भयंकर नरसंहार’ तर सोडाच, याला साधे ‘नरसंहार’ (‘massacre’) ही म्हणता येणार नाही. असे असतानाही तिस्ता सेटलवाड, हर्ष मंदर, अमूल्य गांगुली, प्रफुल्ल बिडवई यांच्यासारखे स्वंघोषित धर्मनिरपेक्षतावादी किंवा तहलका आणि मोदींचे राजकीय विरोधक, यांनी २००२ च्या दंगलींना ‘गुजरात नरसंहार’ असे म्हणण्यास सुरुवात केली आणि ‘गुजरातमधील मुस्लिम नरसंहाराला नरेंद्र मोदींची संमती होती’ असेही सांगितले. गुजरातमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या केवळ १० टक्के असताना, भाजपाचे सरकार आणि नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही मुस्लिमांनी गोधरा नंतरही ४० हजार हिंदूंना बेघर केले. 

 

   आतापर्यंतचे सर्वांत भयंकर हत्याकांड मध्ययुगीन काळात हिंदूंचे झाले होते. १३९९ मध्ये तिमूर याने दिल्लीत एका दिवसात १ लाख हिंदूंचे हत्याकांड केले. नादिरशहा या आक्रमकाने १७३९ मध्ये दिल्लीत मोठे शिरकाण केले. मध्ययुगातील हिंदूंची ही भयंकर हत्याकांडे पाहिल्यानंतर हिटलरने १९३० च्या दशकात गॅस चेंबरममध्ये ज्यूंचे केलेले हत्याकांडही िफके वाटते. मध्ययुगातील हिंदूंची झालेली हत्याकांडे अकबरासह सर्व मुस्लिम सत्ताधारंनी केली होती. फेब्रुवारी १५६८ मध्ये अकबराने ३० हजार हिंदूंना ठार करण्याचा आदेश दिला होता. पहिल्या प्रकरणात आपण भारतावरील मुस्लिम आक्रमणांची आणि त्यांनी केलेल्या हत्यांची छोटीशी यादी पाहिली आहे.

 

   पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही देश १९४७ पूर्वी भारताचाच भाग होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात असलेल्या हिंदूंची संख्या २० टक्क्यांवरून आता १ टक्क्यावर आली आहे. अलीकडच्या काळातला हा सर्वांत मोठा प्रसिद्ध न झालेला नरसंहार, हत्याकांड आहे. आजच्या आधुनिक, प्रगतिशील युगात मात्र हिंदूंना काही ठिकाणी, जसे पाकिस्तानमध्ये, कोल्ह्यांच्या दयेवर सोपविण्यात आल्यामुळे सर्वाधिक नुकसान सोसावे लागत आहे. आजच्या बांगलादेशमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राहणारया हिंदूंची टक्केवारी कमी होत चालली आहे- १९०१ मध्ये ३४ टक्के असणारे हिंदू १९४७ मध्ये २९ टक्के झाले आणि २०११ मध्ये तेथील हिंदूंची संख्या केवळ ८.६ टक्क्यांवर आली. एवढेच नव्हे, तर स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत भारतातील हिंदूंची संख्याही सुमारे ५ टक्क्यांनी कमी झाली. १९५१ मध्ये हिंदू ८५ टक्के होते, ते २०११ मध्ये ७९.८ टक्के झाले. पाकिस्तानमधून हिंदू जवळजवळ नाहीसे झाल्याचा मुद्दा सरकारने, मानवी हक्क कार्यकर्त्यांनी किंवा स्वत:ला उदारमतवादी म्हणविणारया माध्यमांनी कधी जगासमोर मांडला नाही. याउलट भारतीय माध्यमे आणि मुस्लिम प्रचारकांनी गुजरात दंगलींचा मुद्दा अतिशय अतिशयोक्तिपूर्ण वाढविला आणि गेल्या ७० वर्षांत पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहारावर रंगसफेदी केली.

 

   पाकिस्तानमधील सर्वांत मोठे हिंदू नेते सुदामचंद चावला २९ जानेवारी २००२ ला आपल्या राईसमिलमधून परतत असताना जाकोबाबादमध्ये त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यांच्या खुन्यांना कधीच शिक्षा झाली नाही. आपल्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार श्री. चावला अनेक वर्षे पाकिस्तान मानवी हक्क समितीकडे आणि नागरी संघटनांकडे वारंवार करीत होते. (पण त्यांना कोणीच संरक्षण दिले नाही.) ही जर सर्वात मोठ्या हिंदू नेत्याची कथा असेल, तर २० टक्क्यांहून केवळ १ टक्क्यावर पोचलेल्या सर्वसामान्य हिंदूंची कथा काय असेल? http://www.sudhamchandchawla.com 

 

   स्वतंत्र आणि आधुनिक भारतातील हिंसाचाराच्या इतर अनेक घटनांशी तुलना करता २००२ च्या गुजरात दंगली काहीच नव्हत्या. देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरमध्ये सुरू असलेले हिंदूंचे हत्याकांड सर्वांत भयंकर आहे आणि ते अद्यापही अधून-मधून होते. १९८४ मध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या समर्थकांनी शिखांचे भीषण हत्याकांड केले. बिहारमध्ये कॉंग्रेस सत्तेवर असताना भागलपूरमध्ये झालेल्या दंगलीत १९८९ मध्ये १ हजार लोक मारले गेले, त्यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. मुस्लिमांनी हिंदू वस्त्यांवर बॉंब फेकल्यामुळे ही दंगल उद्भवली, असा आरोप आहे. आसाममध्ये १९८३ मध्ये (कॉंग्रेस सत्तेवर असताना) दंगलीच्या एकाच प्रकरणात २१०० लोक मारले गेले.



कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *