फक्त मुस्लिमच बेघर झाले आणि त्यांचेच आर्थिक नुकसान झाले

सत्य – ५ मार्च २००२ ला सुरू झालेल्या ९८ निर्वासित शिबिरांपैकी ८५ मुस्लिमांसाठी, तर १३ हिंदूंसाठी होती. २५ एप्रिल २००२ ला निर्वासितांची एकूण संख्या १ लाख ४० हजार होती, त्यापैकी १ लाख मुसलमान आणि ४० हजार हिंदू होते. अहमदाबादमध्ये दंगलींनी पीडित असलेल्या हिंदूंवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २ पूर्ण वार्तांकने केली आहेत, त्यापैकी एक ७ मे २००२ ला आणि दुसरे १० मे २००२ ला प्रसिद्ध झाले. अहमदाबादमध्ये मुस्लिमांनी दलितांवर हल्ले करून त्यांना बेघर केले. 

 

   ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीप्रमाणे १७ मार्च २००२ पर्यंत केवळ अहमदाबादमध्ये १० हजारहून अधिक हिंदू  बेघर झाले. ही फक्त अहमदाबादची कथा आहे. बडोद्यासारख्या इतर महत्त्वाच्या शहरांत हिंदूंचे काय झाले, याचा उल्लेखही नाही. या बातमीमध्येच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट दिसते की अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीलाच कोणतीही चिथावणी नसताना मुस्लिमांनीही हिंदूंवर काही भागात हल्ले केले जसे बापूनगर आणि जमालपुर. अहमदाबादमधील मुस्लिमबहुल भागात अल्पसंख्येत राहणारया हिंदूंना याची भयंकर झळ सोसावी लागली. मुस्लिम हल्ल्यांची अशीच भीषण झळ दलितांना विशेषत: बसली.

 

   हिंदूंचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. बडोद्यामध्ये मुस्लिमांनी हिंदूंची किमान ३६ दुकाने लुटल्याची बातमी ‘द ट्रिब्र्युन’ने ३० एप्रिल २००२ ला दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीनुसार २१ मार्च २००२ ला अहमदाबादमधील रेवडी बाजारातील हिंदूंची ५० दुकाने मुस्लिमांनी जाळली. हे आर्थिक नुकसान १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. इतर गुजरातमध्येदेखील आणखीन हिंदूंची दुकाने लुटण्यात किंवा जाळण्यात आली. 

कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *