नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रत्येक क्रियेला तेवढीच आणि विरुद्ध प्रतिकिया उमटते’

सत्य- बलबीर पुंज लिहितात, ‘‘धडधडीत कल्पित कथांनी गुजरातचे सत्य झाकोळून टाकले आहे. ‘प्रत्येक क्रियेला तेवढीच आणि विरुद्ध प्रतिकिया उमटते’, असा न्यूटनचा तिसरा सिद्धान्त मोदींनी सांगितल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ मार्चच्या अंकात दिले होते. खरे तर मुख्यमंत्री असे काहीच म्हणाले नव्हते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वगळता इतर कोणत्याही वृत्तपत्राने असे वृत्त मूळ बातमीत दिले नव्हते (३ मार्चला). पण त्यानंतर लिहिण्यात आलेल्या अनेक संपादकीयांतून आणि लेखांतून याच आधारावर गरळ ओकण्यात आले. मोदींच्या सर्व नकारांना केराच्या टोपलीत फेकण्यात आले.”

 

   विरेंद्र कपूर यांनी १९ मार्च २००२ च्या ‘सायबरनून’च्या अंकात लिहिले: 

   ‘‘आपल्या तोंडी ‘ते’ वाक्य घालणारया इंग्रजी वृत्तपत्राला संतप्त मोदींनी प्रतिक्रिया देणारे आणि निषेध नोंदविणारे पत्र पाठविले, ज्यात त्यांनी म्हटले की त्या पत्रकाराला ते कधीही भेटले नाही आणि कुठेही तसे वाक्य उच्चारले नाही, तसे वाक्य उच्चारायची त्यांना संधीच मिळाली नाही, त्यामुळे त्या ‘शोध लावणारया वार्तांकनात’ तातडीने दुरुस्ती करावी. वृत्तपत्राच्या संपादकांनी दुरुस्ती करण्याचे नाकारले आणि मोदींच्या पत्रावर दोन आठवडे बसून राहिले. वृत्तपत्राचे सर्वांत वरिष्ठ संपादक यांचे चालले असते तर ते कदाचित ते पत्र छापू शकले असते. पण तेथे त्यांचा अधिकारच चालत नव्हता. ‘संघपरिवाराच्या संबंधातील सर्व बातम्या दाबून टाका’ असे म्हणणारया नव्या पत्रकारांची फौजच तेथे जमली आहे. वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाला तर जाहिरातींतून िमळणारया महसुलापलीकडे काही दिसत नाही. त्यामुळे मोदींचे पत्र अजून प्रकाशित झाले नाही. त्यामुळे माध्यमे त्यांच्याबाबत पूर्वग्रहदूषित आहेत आणि त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मोदींचे म्हणणे सर्वस्वी चुकीचे नाही. कारण मोदींचे हे वाक्य या वृत्तपत्रात प्रकाशित होताच, इतर सर्व लिखित व टी.व्ही. माध्यमांनी ते पुन्हा पुन्हा प्रकाशित आणि प्रसारित केले.

  अहमदाबाद आणि राज्यातील इतर ठिकाणी अल्पसंख्यकांवर सूड म्हणून झालेले जीवघेणे हल्ले योग्य ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी न्यूटनचा तिसरा सिद्धान्त ज्या दिवशी सांगितला गेल्याचा दावा केला गेला, त्या दिवशी टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातील कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटलाच नव्हता, हे आता चौकशीतून बाहेर आले आहे. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनीही ‘मोदी सरकारची मानसिकता सांगण्यासाठी त्या बातमीदाराने ‘ते’ वाक्य आपल्या मनाने बनविले’, असा निष्कर्ष काढला. दिल्लीमध्ये तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी बातमीदारांच्या एका एकत्रीकरणात बोलताना या वृत्तपत्राचे दिल्लीतील डेप्युटी ब्यूरो चीफ असे म्हणाले की, ‘फॅसिस्ट शक्तींशी संघर्ष करा आणि त्यांना ‘आपल्या’ वृत्तपत्रात अजिबात स्थान देऊ नका.’ अर्थात हे करण्यासाठी ही सर्व बातमी पूर्णपणे कल्पित होती.

   आपला स्वत:चाच फासिझम ब्रॅंड चालविणारया या लोकांच्या वागण्याला वृत्तपत्राच्या मालकांनी आता जागे होणे आवश्यक आहे. दरम्यान मोदी या संदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्याचा विचार करीत आहेत.’’

 

   ‘इंडिया टुडे’ला नरेंद्र मोदी यांनी दिलेली एक मुलाखत ८ एप्रिल २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यात ते म्हणाले, ‘‘दंगली सुरू झाल्यानंतर मी ‘प्रत्येक क्रियेला विरोधी प्रतिक्रिया असते,’ असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले. खरे तर मी अशा प्रकारचे काहीच बोललो नव्हतो. तरीही एका वृत्तपत्राने मी असे म्हटल्याचा फथळा दिला. मी असे काहीच म्हणालो नव्हतो, असे सांगणारे पत्रही मी त्या वृत्त्पत्राच्या संपादकांना लिहिले. माझ्या त्या पत्रकार परिषदेत इलेक्ट्रॉनिक माध्यमेही उपस्थित होती. त्यांचे चित्रीकरण आपण तपासू शकता.’’

(संदर्भ : http://archives.digitaltoday.in/indiatoday/20020408/cover6.html)

 

   ‘द हिंदुस्तान टाइम्स’ला नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत १० मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यात ते म्हणालेत, ‘‘त्या प्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केले नाही. एका मोठ्या वृत्तपत्राने ‘प्रत्येक क्रियेला सारखीच आणि विरोधी प्रतिक्रिया असते’, हा न्यूटनचा सिद्धान्त माझ्या तोंडी घातला. शाळा सोडल्यापासून मी न्यूटनचे नावही कधी घेतले नाही. काल्पनिकता आणि स्वत:च्या इच्छा मांडण्यासाठीच कोणी काही करीत असेल, तर मी काहीच करू शकत नाही. त्याचा उपयोग समाजाला होणार असेल, तर मी दु:ख सहन करायलाही तयार आहे. माझ्याविरुद्ध असणारया सर्वांना मी विनंती करतो की गुजरातमध्ये स्थिती सामान्य होईपर्यंत थांबा…’’

 

   अधिकृत नोंदींवरून हे सिद्ध झाले आहे की त्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कोणाही बातमीदाराला मोदींनी भेटीची वेळ दिली नव्हती. जेव्हा कोणी आरोप करतो तेव्हा त्याला त्याचा पुरावाही द्यावा लागतो. आजपर्यंत कोणीही हे सिद्ध करू शकले नाही की मोदींनी हे वाक्य उच्चारले होते. त्याबद्दल माफी मागण्याचे तर सोडाच, पण त्यांनी मोदींचा खुलासाही ठळकपणे प्रसिद्ध केला नाही. ‘प्रत्येक क्रियेला सारखीच आणि विरोधी प्रतिक्रिया असते’ असे नरेंद्र मोदी म्हणाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एस.आय.टी.ने आपल्या अहवालात म्हटले. माध्यमांतील काही लोकांना हे म्हणणे पचविता आले नाही. त्यामुळे ‘मोदींचे वकिल देतील असा अहवाल एस.आय.टी.ने दिला’ असा आरोप काहींनी एस.आय.टी. वर केला. असे मोदी जर म्हणालेच नसतील, तर एस.आय.टी. ने जबरदस्तीने असा खोटा दावा करायला हवा होता का?

कल्पित कथा

Tags: No tags

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *